रानोमाळ भटकंती,
वाटेल तिथं अडोशाला
मीळेल तिथं विश्रांती.
थोडं पहुडल्यावर पुन्हा तीच भ्रमंती.
असंच काय जीणं असतं?
वस्त्यांच्या होतात वसाहती
अन वसाहतीnchi साम्राज्यं!
तरीही वाटत राहतं
आत आत खोलवर
स्वतःचं असं आभाळ निर्माण करायला
हवी असते थोडीतरी जागा
जमिनीवर!
माणसं बघतात, माणसं हसतात,
तोंडओळखीची पक्की जिवलग होतात.
कधी भांडतात अन दुरावतात,
आतल्या आवाजानं पुन्हा एकत्र येतात.
अशी नाती-गोती
जवळची दूरची
अन मैत्री हि सहज सलगीची,
तरीही खुणावतं
स्वैर पाखरू फांदीवर...
स्वतःचं असं घरटं निर्माण करण्यासाठी
हवी असतात किमान दोन माणसं
एकमेकांची
आयुष्यभर......!
Comments